October 9, 2018
Lord_Ramji-hd.jpg

अभंग आणि गजर डाउनलोड लिंक
जय जय राम कृष्ण हरि ​(गजर ) MP3
​मरा मरा उलटे म्हणता (अभंग)
MP3
​रामनामाची गोडी ​(गजर ) MP3
​रक्षण कर्ता तू ​(गजर ) MP3
​दत्तगुरुच्या लेकरा (गजर )
MP3

 


October 9, 2018
Lord_Ramji-hd.jpg

Elucidating the importance of Ramnaam, Sadguru Shree Aniruddha says that Ramnaam is the Sadguru in itself. It is said that there is no such sin, which cannot be destroyed by Ramnaam, there is no such sinner who cannot be delivered from sin by the Ramnaam, and there will never be one. Hence, many Indian saints such as Tulsidas, Ramdas and many others reiterate the significance of Ramnaam before us.

It is not necessary to perform long-drawn penance or austerity to please Shree Ram. Shree Ram bestows his grace on every Bhakta, who does his bhakti even to the slightest extent or puts in even the modest of efforts in his pursuance.

Several saints have described the importance of Ramnaam through their various sacred works, Abhangas (devotional songs) and compositions –

प्रबिसि नगर कीजे सब काजा। हृदयँ राखि कौसलपुर राजा। गरल सुधा रिपु करहिं मिताई गोपद सिंधु अनल सितलाई॥

(सुंदरकांड २९)

[Prabisi Nagar Kijey Sab Kaaja, Hriday Rakhi Kosalpur Raja
Garal Sada Ripu Karai Mitai, Gopad Sindhu Anull Sitlai]

(Meaning- When one keeps Kausalpur’s King Lord Rama in his heart and enters the city to do the assigned work, he certainly achieves success.)

The Mahamantra of the Bhagwat Dharma, ‘Jai Jai Ram Krishna Hari’ was granted upon great Saint Tukaram by his Sadguru. The burning in the throat that Lord Paramshiva felt after consuming the Halahal poison obtained during the Amritmanthan (churning of the ocean) was soothed only after chanting of the Ramnaam. Also, Shree Hanuman says in Sunderkand

 सो सब तव प्रताप रघुराई। नाथ न कछु मोरि प्रभुताई॥
                                                                     (सुंदरकांड १८९)

[Sau Sab Tav Pratap Raghurai, Nath Na Kachhu Mori Prabhutai]

(Meaning- O Raghuraya! It is not my greatness, but it is you and your glory alone that has made all of this possible!)

हिंदी मराठी


October 9, 2018
Lord_Ramji-hd.jpg

रामनामाचं महत्व विषद करताना सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध म्हणतात की रामनाम हे स्वतः सद्‌गुरु आहे. रामनामाबद्दल सांगितले गेले आहे आहे की रामनामाने नाश झाला नाही अशी पापं नाहीत आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी नाही आणि होणारही नाही. आणि म्हणूनच ह्या भारतभूमीवरील तुलसीदास, रामदास यांसारखे अनेक संत या रामनामाचे महत्व आपल्यासमोर मांडतात.

रामाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या तपश्च्यर्यांची किंवा साधनांची गरज नाही. राम हा कोणी जरी थोडीशी सुद्धा भक्ति केली, त्याच्यासाठी अगदी अल्पही प्रयास केले, तरी त्या भक्ताचे कल्याण करतो.

अनेक संतांनी रामनामाचे महत्व अनेक ग्रंथातून, अभंगातून, त्यांच्या रचनांमधून सांगितले आहे.
उदाहरण द्यायचेच झाले तर :

१) संत तुलसीदासजी त्यांच्या रामचरितमानस या ग्रंथातील सुंदरकांड या पर्वात म्हणतात,

प्रबिसि नगर कीजे सब काजा। हृदयँ राखि कौसलपुर राजा।
गरल सुधा रिपु करहिं मिताई। गोपद सिंधु अनल सितलाई ।।

                                                                                              (सुंदरकांड २९)

(अर्थ: आपण नगरात शिरुन सर्व काम करावे. श्रीरामांना ह्र्द्यात धारण करुन काम करताना विषदेखील अमृत होते व शत्रूदेखील त्याच्याशी मैत्री करतो. समुद्र गायीच्या खुराच्या आकाराच्या खड्ड्यात सामावला जातो व अग्नीचा दाहकपणा दूर होतो.)

’जय जय रामकृष्ण हरि’ हा भागवत धर्माचा महामंत्रच श्रेष्ठ संत तुकारामांना त्यांच्या सद्‌गुरुंनी दिला अमृतमंथनाच्या वेळेस बाहेर आलेले हलाहल विष प्यायलानंतर परमशिवाला दाह होऊ लागला व त्या दाहाचे शमन केवळ रामनामाचा जप केल्यानेच झाले आणि प्रत्यक्ष हनुमानजीही सुंदरकांडामध्ये प्रभू रामचंद्रांना सांगतात,

सो सब तव प्रताप रघुराई। नाथ न कछू मोरि प्रभुताई।।

                                                                 (सुंदरकांड १८९)

(अर्थ: हे रघुनाथा! सर्वकाही आपल्या प्रतापामुळेच घडले. हे नाथ! त्यात माझा काहीही मोठेपणा नाही.)

 

English हिंदी


October 9, 2018
Store-AnjanaMata-Book.jpg

In 2011, on the occasion of ‘Shree Varadchandika Prasannotsav’, Sadguru Aniruddha gave a unique gift to the ‘Aniruddha’s Universal Bank of Ramnaam’ to help everyone to increase propinquity to God and to succeed on the path of ‘Bhakti’ more effectively. This gift was the ‘Anjanamata’ book. Anjanamata (Aadimata Anjani) is the mother of ‘Mahapran’ Hanuman. Shree Hanuman is the only one who possesses the ‘Swaha’ (complete dedication) and the ‘Swadha’ (self-sufficiency), both the qualities together at the same time. Hence, for us to obtain them, the book has been designed in such a way that the mantra ‘Om Harimarkataya Swaha’ is written below the left feet of Shree Hanuman.

Aanjanamata Book – Jap Count

Jap Jap Count
Om ShreePanchamukhaHanumantaya Anjaneyay namo Namah
Om  HariMarkataya Swaha
ShriMahakundalini Anjanamata Vijayate
Om Anjanisutaya Mahaviryapramathanaya Swaha
Om Shri Ramadutaya hanumantaya Mahapranaya mahabalaya Namo Namah

October 8, 2018
Store-ramnaam-book-08-1280x834.jpg

The Ramnaam (the name Shree Ram) is the most sacred name; so is the Gurunaam.” I am therefore starting a bank, a bank of the Ramnaam, the name of God.”

– Sadguru Shree Aniruddha

These words of Sadguru Shree Aniruddha marked the initiation of the project, which meant to provide joy and fill happiness in the lives of all Shraddhavans. This unique project, launched on 18th August 2005 is known as the ‘Aniruddha’s Universal Bank of Ramnaam’.

A common man still gets cold feet when it comes to a bank, banking transactions and its rules. However, the ‘Bank of Ramnaam’ drives away all sorts of fears, problems and anxieties. Every Shraddhavan feels the close bond with this Bank, which is based on simple rules.

In the very first month of its inception, 43,138 accounts were opened, and 62,158 Ramnaam books were deposited with the Bank.

 

मराठी  हिंदी 


October 3, 2018
AUBR_BENIFITS-1.jpg

‘रामनाम’ आणि त्याचबरोबर इतर जप लिहिणे हेच या आगळ्यावेगळ्या बँकेचे भक्तिचलन आहे. कमीत कमी एक वही लिहून ती जमा केली की ह्या रामनाम बँकेचा सभासद होता येते. सभासद झाल्यावर प्रत्येक श्रद्धावानाला एक पासबुक दिले जाते.

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) सांगतात की, श्रद्धावानाला जेव्हा संकट काळात मदतीची, आधाराची खरी गरज असेल, तेव्हा सद्गुरुतत्व, ते परमतत्त्व त्याला ह्या ‘भक्ति बँकेतून’ आवश्यक तेवढे सहाय्य नक्कीच पुरवणार. ज्याचे त्याच्या सद्गुरुतत्त्वावर जेवढे प्रेम त्याला त्या प्रमाणात त्याचे ‘भक्तिरूपी व्याज’ सहाय्याच्या स्वरूपात मिळते.

बँकेच्या कामकाजाचे वर्ष अनिरुद्ध पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) ते अनिरुद्ध पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) असे आहे. सर्व ‘सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रं’ ह्या बँकेच्या शाखा आहेत. ही बँक युनिव्हर्सल असल्यामुळे श्रद्धावान आपली लिहून पूर्ण झालेली वही कुठल्याही शाखेत जमा करू शकतात.

प्रत्येकाची वही प्रत्येकाने स्वत:च लिहून पूर्ण करायची आहे. रामनाम वहीच्या पहिल्या पानावर (अर्पण पत्रिकेवर) आपले संपूर्ण नाव, खाते क्रमांक व वही कोणासाठी लिहिली आहे याची माहिती असते. श्रद्धावानांनी अशाप्रकारे जमा केलेल्या प्रत्येक वहीतील पहिली पाने (अर्पण पत्रिका) प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा एकादशीला एकत्र करून त्यांचे पूजन केले जाते.

एका वर्षामध्ये श्रद्धावानाने किमान १८ वह्या जमा केल्यावर त्या श्रद्धावानाला त्या वर्षाचे बॅंकेचे वार्षिक सभासदत्व मिळते. खाते उघडलेल्या तारखेपासून पुढील पाच वर्षात १५० वह्या जमा केल्या, तर तो श्रद्धावान बँकेचा आजीव सभासद होतो. वही लिहिणार्‍या श्रध्दावानाला ठराविक वह्या लिहिल्यानंतर विशिष्ट लाभ मिळतात. श्रद्धावानांनी जमा केलेल्या ह्या रामनाम वह्यांपासूनच गणेशमूर्ती व सच्चिदानंद पादुका तयार केल्या जातात. त्यामुळे ही ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ भक्तिच्या पवित्र साधनाबरोबरच प्रत्यक्ष जीवनात आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासही मोलाचे योगदान देते.

 

हिंदी English

 


October 3, 2018
Store-AnjanaMata-Book.jpg

भगवंताशी सामिप्य अधिक वाढावे व भक्तिमार्गावर अधिकाधिक आणि वेगाने प्रगती करता यावी, यासाठी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी २०११ साली ‘श्रीवरदचंडिका प्रसन्नोत्सवा’ त ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ ला एक अनोखी भेट दिली. ही भेट होती, अंजनामाता वहीची!

अंजनामातेचा (आदिमाता अंजनीचा) पुत्र म्हणजे महाप्राण हनुमंत. हा एकमेव ‘हनुमंत’च असा आहे, ज्याने ‘स्वाहा’ (पूर्ण समर्पण) व ‘स्वधा’ (पूर्ण स्वावलंबन, स्वयंपूर्णता) हे दोन्ही गुण धारण केले आहेत. म्हणूनच हा स्वधाकार प्राप्त करून घेण्यासाठी ‘ॐ हरिमर्कटाय स्वाहा’ हा मंत्र हनुमंताच्या डाव्या चरणाच्या खाली लिहिला जाईल अशी रचना ह्या वहीमध्ये केलेली आहे.

अंजनामाता वही – जप संख्या

जप जप संख्या
ॐ श्रीपंचमुखहनुमन्ताय आंजनेयाय नमो नम:।
ॐ हरिमर्कटाय स्वाहा।
श्रीमहाकुंडलिनी अंजनामाता विजयते।
ॐ अंजनीसुताय महावीर्यप्रमथनाय स्वाहा।
ॐ श्री रामदूताय हनुमन्ताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:।

October 3, 2018
Store-ramnaam-book-08-1280x834.jpg

‘रामनाम वही’ ही २२० पानांची वही आहे, जी भक्तांना सोप्या स्वरूपात भगवत्‌नाम, गुरुनाम लिहिण्याबरोबरच नाम-उच्चारणाचीही सुवर्णसंधी देते. ह्या वहीत पहिल्या १०८ पानांवर ‘राम’ नाम लिहायचे असते. पुढील प्रत्येकी २८ पानांवर अनुक्रमे ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ’कृष्ण’, ’दत्तगुरु’ व ’जय जय अनिरुद्ध हरि’ हा मंत्र लिहायचा असतो. रामनाम वहीच्या प्रत्येक पानावर भक्तिमार्गाचा अग्रणी, श्रीरामप्रभूंचा दास असणार्‍या श्री हनुमंताच्या साक्षीने प्रत्येक नाम लिहीले जाते.

श्रीहनुमंताच्या आकृतिबंधात ‘राम’ नाम लिहिण्याचे महत्त्व खूप वेगळे आहे. जेव्हा आपल्या श्रद्धेय सीतामाईला लंकेमधून आणण्यासाठी ‘श्रीरामेश्वर ते लंका’ असा अभेद्य सेतू वानरसैनिकांना बांधायचा असतो, तेव्हा स्थापत्यशास्त्रातील अत्युच्च आचार्य असणार्‍यात भौम ऋषींकडे शिक्षण घेतलेले नल व नील हे वानरवीर हा सेतू बांधण्याच्या कार्यास सुरुवात करतात. परंतु कार्याचे व्यापकत्व व दुर्गमता जाणून श्रीहनुमंत वेळीच पुढे सरसावतात व समुद्रात टाकल्या जाणार्यात प्रत्येक पाषाणावर स्वहस्ते ‘श्रीराम’ नाम लिहू लागतात. श्रीरामनामाने अजीव व जड पाषाणही पाण्यात बुडत नाहीत, तर तरंगतात व त्यांच्या समुदायाने समुद्रावर सेतू बांधला जातो. श्रद्धावान जेव्हा रामनाम वही लिहीत असतो, तेव्हा त्याच्याही जन्मजन्मांच्या प्रवासातील अनेक सुंदर सेतू असेच सहजतेने श्रीहनुमंत बांधून घेतात, अशी श्रद्धावानांची भावना आहे.

या रामनाम बॅंकेचे महत्त्व सांगताना सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणतात,‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा एक महामार्ग, जो सरळसाध्या श्रद्धावानालाही सुखी जीवनाच्या वाटेवर घेऊन जातो, त्याला भक्कम आधार देतो.’

अशाप्रकारे जप लिहीण्याचा कोटीगुणे लाभ सर्व श्रद्धावान मित्रांनाही मिळावा ह्या तळमळीपोटीच सद्‍गुरु श्री अनिरुद्धांनी ही रामनामाची वही दिली.

रामनाम वहीतील पाचही मंत्र जिवंत आहेत, रसमय आहेत. हनुमंत चिरंजीव आहे व अखंड रामनामाचा जप करतो. जेव्हा मी रामनाम उच्चारतो, तेव्हा ते रामनाम आपोआप हनुमंताच्या उच्चारात सामावले जाते. थोडक्यात, रामनाम वही लिहिताना मी एकटा नाही, तर हे नाम ‘जो’ नित्यत्वाने उच्चारत आहे, त्याच्याशी मी सहज जोडला जातो, हा महत्वाचा लाभ रामनाम वही लिहिण्याने मला मिळतो.

काही विशेष प्रसंगी म्हणजेच वाढदिवस, लग्न अशा निमित्ताने किंवा आपल्या आप्तांच्या सुख व समृद्धीच्या प्राप्तीसाठी त्यांच्या नावे वही लिहून जमा करता येते. ही वही जो श्रद्धावान लिहितो त्यालाही आणि ज्याच्या नावे ही वही लिहिली आहे त्यालाही याचा लाभ मिळेल. मृत व्यक्तीच्या नावे रामनाम वही लिहिली, तर दिवंगताला रामनामामुळे पुढची गती अधिक चांगली मिळते अशी श्रध्दावानांची भावना आहे.

रामनाम वही लिहिताना लिहिणार्‍याच्या हातून नवविधा भक्तीतील श्रेष्ठ ‘श्रवण’ भक्ती घडतेच कारण नाम लिहिताना डोळ्यांनी ते वाचले जाणार आहे, जप मनाने उच्चारला जाणार आहे व त्याच वेळी त्याचे सहज श्रवणही होणार आहे, म्हणूनच रामनाम वही म्हणजे सहज भक्ती करण्याचे, ध्यान करण्याचे पवित्र साधन आहे.

रामनाम वही – जप संख्या

जप जप संख्या
राम
श्री राम जय राम जय जय राम
कृष्ण
दत्तगुरु
जय जय अनिरुद्ध हरि

September 17, 2018
Lord_Ramji.jpg

रामनाम का महत्व समझाते हुए सद्‌गुरु श्री अनिरुद्धजी कहते हैं कि, रामनाम स्वयं अपनेआप में सद्‍गुरु है। रामनाम के बारे में कहा गया है कि, रामनाम से नाश न हो ऐसा पाप नहीं है और रामनाम से उद्धार न हो ऐसा पापी नहीं है, और होगा भी नहीं। इसीलिए इस भारतभूमि में तुलसीदासजी, रामदासजी, जैसे अनेक संत रामनाम का महत्व हमारे समक्ष बयान करते हैं।

प्रभू श्रीराम को प्रसन्न करने के लिए बडी बडी तपस्याओं की अथवा साधनाओं की जरूरत नहीं है। यदि कोई रामजी की थोड़ीसी भी भक्ति करे, उनके लिए जरासे भी प्रयास करे, तब भी वे उस भक्त का कल्याण करते हैं।

कई संतों ने रामनाम का महत्व अनेक ग्रंथों के माध्यम से, अभंगो के माध्यम से, उनकी रचनाओं के माध्यम से बताया है। उदाहरण के तौर पर :

संत तुसलीदासजी अपने रामचरितमानस ग्रंथ में सुंदरकांड नामक पर्व में कहते है,

प्रबिसि नगर कीजे सब काजा। हृदयँ राखि कौसलपुर राजा।
गरल सुधा रिपु करहिं मिताई । गोपद सिंधु अनल सितलाई॥
                                                                                            (सुंदरकांड २९)

(अर्थ: आप नगर में प्रवेश करके सभी कार्य कीजिए। श्रीराम को अपने हृदय में धारण करके काम करते हुए विष भी अमृत बन जाता है और शत्रु भी उसके साथ मित्रता कर लेता है। समुद्र गाय के खुर के आकार के गड्‍डे में समाया जाता है तथा अग्नि की दाहकता दूर हो जाती है।)

भागवत धर्म का महामंत्र ‘जय जय रामकृष्ण हरि’ श्रेष्ठ संत तुकारामजी को उनके सद्‍गुरु ने दिया। अमृतमंथन के समय निकला हुए हलाहल विष पी लेने पर परमशिवजी को दाह होने लगा और उस दाह का शमन केवल रामनाम का जाप करने से ही हुआ तथा साक्षात हनुमानजी भी सुंदरकांड में प्रभु श्रीरामचंद्र से कहते हैं,

सो सब तव प्रताप रघुराई। नाथ न कछु मोरि प्रभुताई॥
                                                                                    (सुंदरकांड १८९)

(अर्थ: हे रघुनाथ! सबकुछ आपके प्रताप के कारण ही हुआ। हे नाथ! इसमें मेरी कोई बड़ाई नहीं है।)

 

Englishमराठी

 



Contact Us

Address:

101, Link Apartments, Old Khari Village, Khar (W), Mumbai – 40052, Maharashtra, India

Email Address: aubr.ramnaam@gmail.com

Timing: Monday to Saturday – 11 am to 7.30pm  (Excluding Thursday)

              Thursday: Thursday 11 am to 4 pm